सगळं ‘वेळच्या वेळी’ झालेलं बरं!
एक काळ असा होता की, पदवी परीक्षा झाल्यावर मुलांनी नोकरीला लागायचं आणि पदवीचं शिक्षण सुरू असताना किंवा पदवी परीक्षेनंतर मुलींसाठी ‘स्थळ’ बघायला लागायची, असा एक शिरस्ता होता. त्या शिरस्त्यानुसार लग्नं, मुलांचे जन्म वगैरे सगळं कसं ‘वेळच्या वेळी’ होऊन गुण्यागोविंदानं संसार केलेल्यांच्या पुढच्या पिढ्या आता विवाहयोग्य वयाच्या झाल्या आहेत. मात्र, आपला मुलगा/मुलगी अथवा नात/नातू विवाह करण्यायोग्य वयाचा/वयाची होऊन ही विवाहोत्सुक नाहीत, लग्नासाठी तयार नाहीत, हे बघून मागच्या पिढीतल्यांना काही उमजेनासं झालंय्. त्यांच्या मनात प्रचंड कालवाकालव होतेय्. ‘सगळं’ वेळच्या वेळी झालेलं बरं! असा धोशा ते त्यांच्या लेखी विवाह योग्य वयाचे झालेल्या मुला-मुलींच्या, नातवंडांच्या मागे लावताहेत आणि मुला-मुलींना, नातवंडांना ते मनावर घेण्यासाठी वेळच नाहीये असं सध्याचं चित्र आहे.
सध्याची पिढी शिक्षण, करीअर ह्यात गुंतली आहे. सध्याचं युग ‘सुपरस्पेशलायझेशन’चं आहे. त्यामुळे नुसत्या पदवीला तेवढा अर्थ उरलेला नाहीये आणि नुसत्या पदवीत कुणाला फारसं स्वारस्यही उरलेलं नाहीये. इंजिनीअरिंगच्या पदवीनंतर पदव्युत्तर पदवी, पीएच्.डी किंवा एमबीए करण्याचा आणि वैद्यकीय पदवीनंतर स्पेशलायझेशन आणि सुपरस्पेशलायझेशन करण्याचा मुला-मुलींचा कल आहे. त्यांच्या आयुष्यातली, तारुण्यातली महत्त्वाची वर्षे शिक्षणातच खर्ची पडताहेत. परिणामी, वयाच्या तिशी-बत्तिशीपर्यंत विद्यार्थिदशेत असलेल्यांना अचानक गृहस्थाश्रमाची जबाबदारी पेलण्याची कल्पनाही नको वाटते. संसारात गुंतून करीअरवर पाणी सोडण्याचा विचारही नको वाटतो. आतापर्यंत त्यांची संपूर्ण शक्ती आणि ‘फोकस’ अभ्यास, करीअर यावर असल्यामुळे लग्न झाल्यावर संसार करताना, बाह्य जगात वावरायला अंगी वेगळे गुण, वेगळा दृष्टिकोन, वेगळी गुणवत्ता त्यांचा वैचारिक गोंधळ उडू लागतो. काही जणांना, शिक्षण, उत्तम नोकरी वगैरे मिळाल्यावर आत्ता कुठे जरा निवांतपणा मिळतोय्, त्यामुळे एवढ्यात लग्न करून आपल्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण कशाला ओढवून घ्या, असं वाटू लागतं.
पूर्वीच्या पिढ्यांमध्ये स्वयंपाकघरात स्वयंपाक करणार्या आईला बघत बघत, प्रसंगी लहानमोठी मदत करून लहानाच्या मोठ्या झालेल्या मुलींना, पुढे लग्नानंतर स्वयंपाक करणं अवघड जात नव्हतं. पण कालौघात नंतरच्या पिढीतही, स्वयंपाकाला बाई, बाहेर जेवणं, जेवण ‘ऑर्डर’ करणं वगैरे वाढू लागलं. आता तर लोक आपल्या घरी आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवतात तरी का, अशी शंका येण्याइतकी परिस्थिती असताना आणि अभ्यासात, अभ्यासेतर व्यापात (को-करिक्युलर ऍक्टिव्हिटिज) गर्क असलेल्या मुलींना ‘एवढा बटाटा चिरून दे किंवा एवढं खोबरं खवून दे’ असं ‘ट्रेनिंग’ मिळणं आपोआपच बंद झालं. त्यामुळे विवाहयोग्य वय असलेल्या मुलीला स्वयंपाक करता येईल, ही अपेक्षा करणंही व्यर्थ ठरू लागलंय्. पण गंमत म्हणजे, विदेशात शिक्षण वा नोकरीनिमित्त गेलेल्या मुलींनाच काय पण मुलांनाही स्वयंपाक करणं, भांडी घासणं वगैरे स्वतःचे स्वतः करावे लागत असल्यामुळे परदेशात गेलेली भारतीय मुले-मुली आपसूक गृहकृत्यदक्ष, गृहकार्यप्रवीण होताहेत! एकूणात, अभ्यासात हुशार असलेल्या आपल्या मुलाला, मुलीला नवरा-बायको म्हणून जबाबदारी पेलायला आपण सक्षम केलंय् की नाही, तसं जीवनाभिमुख शिक्षण आपण त्यांना दिलंय् की नाही, ते जसे आहेत, त्याला आपणही जबाबदार तर नाही ना, हे आई-वडिलांनी पण तपासून पहायची वेळी आलेली आहे.
दर बारा/पंधरा वर्षांनी पिढी बदलते असं समजण्याचा काळ कधीच सरला. आज तीस वर्षांचे असलेले तरुण-तरुणी पंचविशीतल्या तरुण-तरुणींसाठी ‘मागची पिढी’ ठरतील, एवढ्या सपाट्यानं तरुणाईची मानसिकता बदलतेय्. ह्या बदलाला प्रचंड वेग आहे आणि तो वेग भल्याभल्यांची मती गुंग करणारा आहे. वेगवेगळी समाजमाध्यमं, चित्रपट, टीव्ही यांच्या मार्यामुळे मुलींचं ‘वयात येण्या’चं वय अलीकडे खूपच सरकलंय् असं अनेक शाळांच्या मुख्याध्यापिकांचं म्हणणं आहे. (अनेक मुख्याध्यापिकांशी झालेल्या माझ्या बातचितीवर आधारित हा विस्तृत लेख पुढे कधीतरी... पण तो समाजाच्या हिताचा विचार करणार्यांना नक्कीच अंतर्मुख करेल!) म्हणजे बघा! मुले-मुली खूप लवकर वयात येताहेत, शालेय वयात किंवा उशिरात उशिरा म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यावर तरुण-तरुणींनी प्रेमात पडावं असे संदेश चित्रपट देताहेत, त्याचवेळी विवाहयोग्य वयाचे होऊनही तरुण-तरुणींना एवढ्यात लग्न करायचं नाहीये, त्यामुळे उशिरा लग्न, उशिरा मूल किंवा मूलच नको (डबल इन्कम नो किड्स DINK) कारण मूल जन्माला घालायचं तर त्यासाठी करीअरिस्ट स्त्रीला वेळ नाही, अगदी त्या बाळाचं संपूर्ण संगोपन घरचे करायला तयार असले तरीही प्रत्यक्ष मातृत्व त्या स्त्रीलाच नऊ महिने निभवावं लागणार (आता सरोगसीद्वारे तेही करण्याची गरज उरली नाही म्हणा!) असं चित्र आहे. म्हणजे एकीकडे अत्यंत सुसंपन्न, उच्चशिक्षित अशा तरुण-तरुणींच्या मुलांची संख्या आक्रसतेय्, त्याचवेळी आर्थिक विपन्नावस्थेतल्या अशिक्षित लोकांकडून लोकसंख्येत मोठी भर पडतेय्. या विषम परिस्थितीमुळे वीस-पंचवीस वर्षानंतरचं चित्र काय असेल, हा विचारसुद्धा भयावह वाटतो.
मध्यंतरी मी दोन नाटके लिहून, दिग्दर्शित करून दिल्लीत सादर केली. त्यात पंधरा बे्रस्ट कॅन्सरच्या रुग्णांनी काम केलं होतं. थिएटर ऍज थेरपी ही माझी संकल्पना मी त्यांच्यासाठी राबवली आणि ती प्रचंड यशस्वी झाली. दोन्ही नाटकं दृष्ट लागण्याजोगी उत्कृष्ट झाली. तेव्हा भारतात स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतंय्. ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे उशिरा लग्न करणं, उशिरा मूल होणं अथवा मूल न होऊ देणं, बाळाला स्तनपान न करवणं, ही कारणं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. एकूणात वैद्यकीयदृष्ट्या पण उशिरा लग्न करण्यात तोटे अधिक आहेत.
सध्याची पिढी शिक्षण, करीअर ह्यात गुंतली आहे. सध्याचं युग ‘सुपरस्पेशलायझेशन’चं आहे. त्यामुळे नुसत्या पदवीला तेवढा अर्थ उरलेला नाहीये आणि नुसत्या पदवीत कुणाला फारसं स्वारस्यही उरलेलं नाहीये. इंजिनीअरिंगच्या पदवीनंतर पदव्युत्तर पदवी, पीएच्.डी किंवा एमबीए करण्याचा आणि वैद्यकीय पदवीनंतर स्पेशलायझेशन आणि सुपरस्पेशलायझेशन करण्याचा मुला-मुलींचा कल आहे. त्यांच्या आयुष्यातली, तारुण्यातली महत्त्वाची वर्षे शिक्षणातच खर्ची पडताहेत. परिणामी, वयाच्या तिशी-बत्तिशीपर्यंत विद्यार्थिदशेत असलेल्यांना अचानक गृहस्थाश्रमाची जबाबदारी पेलण्याची कल्पनाही नको वाटते. संसारात गुंतून करीअरवर पाणी सोडण्याचा विचारही नको वाटतो. आतापर्यंत त्यांची संपूर्ण शक्ती आणि ‘फोकस’ अभ्यास, करीअर यावर असल्यामुळे लग्न झाल्यावर संसार करताना, बाह्य जगात वावरायला अंगी वेगळे गुण, वेगळा दृष्टिकोन, वेगळी गुणवत्ता त्यांचा वैचारिक गोंधळ उडू लागतो. काही जणांना, शिक्षण, उत्तम नोकरी वगैरे मिळाल्यावर आत्ता कुठे जरा निवांतपणा मिळतोय्, त्यामुळे एवढ्यात लग्न करून आपल्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण कशाला ओढवून घ्या, असं वाटू लागतं.
पूर्वीच्या पिढ्यांमध्ये स्वयंपाकघरात स्वयंपाक करणार्या आईला बघत बघत, प्रसंगी लहानमोठी मदत करून लहानाच्या मोठ्या झालेल्या मुलींना, पुढे लग्नानंतर स्वयंपाक करणं अवघड जात नव्हतं. पण कालौघात नंतरच्या पिढीतही, स्वयंपाकाला बाई, बाहेर जेवणं, जेवण ‘ऑर्डर’ करणं वगैरे वाढू लागलं. आता तर लोक आपल्या घरी आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवतात तरी का, अशी शंका येण्याइतकी परिस्थिती असताना आणि अभ्यासात, अभ्यासेतर व्यापात (को-करिक्युलर ऍक्टिव्हिटिज) गर्क असलेल्या मुलींना ‘एवढा बटाटा चिरून दे किंवा एवढं खोबरं खवून दे’ असं ‘ट्रेनिंग’ मिळणं आपोआपच बंद झालं. त्यामुळे विवाहयोग्य वय असलेल्या मुलीला स्वयंपाक करता येईल, ही अपेक्षा करणंही व्यर्थ ठरू लागलंय्. पण गंमत म्हणजे, विदेशात शिक्षण वा नोकरीनिमित्त गेलेल्या मुलींनाच काय पण मुलांनाही स्वयंपाक करणं, भांडी घासणं वगैरे स्वतःचे स्वतः करावे लागत असल्यामुळे परदेशात गेलेली भारतीय मुले-मुली आपसूक गृहकृत्यदक्ष, गृहकार्यप्रवीण होताहेत! एकूणात, अभ्यासात हुशार असलेल्या आपल्या मुलाला, मुलीला नवरा-बायको म्हणून जबाबदारी पेलायला आपण सक्षम केलंय् की नाही, तसं जीवनाभिमुख शिक्षण आपण त्यांना दिलंय् की नाही, ते जसे आहेत, त्याला आपणही जबाबदार तर नाही ना, हे आई-वडिलांनी पण तपासून पहायची वेळी आलेली आहे.
दर बारा/पंधरा वर्षांनी पिढी बदलते असं समजण्याचा काळ कधीच सरला. आज तीस वर्षांचे असलेले तरुण-तरुणी पंचविशीतल्या तरुण-तरुणींसाठी ‘मागची पिढी’ ठरतील, एवढ्या सपाट्यानं तरुणाईची मानसिकता बदलतेय्. ह्या बदलाला प्रचंड वेग आहे आणि तो वेग भल्याभल्यांची मती गुंग करणारा आहे. वेगवेगळी समाजमाध्यमं, चित्रपट, टीव्ही यांच्या मार्यामुळे मुलींचं ‘वयात येण्या’चं वय अलीकडे खूपच सरकलंय् असं अनेक शाळांच्या मुख्याध्यापिकांचं म्हणणं आहे. (अनेक मुख्याध्यापिकांशी झालेल्या माझ्या बातचितीवर आधारित हा विस्तृत लेख पुढे कधीतरी... पण तो समाजाच्या हिताचा विचार करणार्यांना नक्कीच अंतर्मुख करेल!) म्हणजे बघा! मुले-मुली खूप लवकर वयात येताहेत, शालेय वयात किंवा उशिरात उशिरा म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यावर तरुण-तरुणींनी प्रेमात पडावं असे संदेश चित्रपट देताहेत, त्याचवेळी विवाहयोग्य वयाचे होऊनही तरुण-तरुणींना एवढ्यात लग्न करायचं नाहीये, त्यामुळे उशिरा लग्न, उशिरा मूल किंवा मूलच नको (डबल इन्कम नो किड्स DINK) कारण मूल जन्माला घालायचं तर त्यासाठी करीअरिस्ट स्त्रीला वेळ नाही, अगदी त्या बाळाचं संपूर्ण संगोपन घरचे करायला तयार असले तरीही प्रत्यक्ष मातृत्व त्या स्त्रीलाच नऊ महिने निभवावं लागणार (आता सरोगसीद्वारे तेही करण्याची गरज उरली नाही म्हणा!) असं चित्र आहे. म्हणजे एकीकडे अत्यंत सुसंपन्न, उच्चशिक्षित अशा तरुण-तरुणींच्या मुलांची संख्या आक्रसतेय्, त्याचवेळी आर्थिक विपन्नावस्थेतल्या अशिक्षित लोकांकडून लोकसंख्येत मोठी भर पडतेय्. या विषम परिस्थितीमुळे वीस-पंचवीस वर्षानंतरचं चित्र काय असेल, हा विचारसुद्धा भयावह वाटतो.
मध्यंतरी मी दोन नाटके लिहून, दिग्दर्शित करून दिल्लीत सादर केली. त्यात पंधरा बे्रस्ट कॅन्सरच्या रुग्णांनी काम केलं होतं. थिएटर ऍज थेरपी ही माझी संकल्पना मी त्यांच्यासाठी राबवली आणि ती प्रचंड यशस्वी झाली. दोन्ही नाटकं दृष्ट लागण्याजोगी उत्कृष्ट झाली. तेव्हा भारतात स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतंय्. ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे उशिरा लग्न करणं, उशिरा मूल होणं अथवा मूल न होऊ देणं, बाळाला स्तनपान न करवणं, ही कारणं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. एकूणात वैद्यकीयदृष्ट्या पण उशिरा लग्न करण्यात तोटे अधिक आहेत.
आपली मुलं लग्न करतील कधी, त्यांना पुढे मुलेबाळे होतील कधी, होतील तेव्हा त्यांच्या संगोपनासाठी आपण हातीपायी धड असलो पाहिजे हा विचार आई-वडिलांच्या मनात घोळत असतो. अनेक प्रकारांनी आपल्या मुलांचे चांगले व्हावे, म्हणून ते सुचवत असतात. अशावेळी ते जे सांगताहेत त्यावर एखाद्या प्रोजेक्टप्रमाणे विचार केला, तर त्यांनाही पटेल की सगळं काही वेळच्या वेळी झालेलं बरं!
- रश्मी घटवाई
- रश्मी घटवाई
